Sunday, January 15, 2012

संज्ञापन तंत्राच्या विकासातील क्रांतिकारक टप्पे

  • गटेनबर्गाचे सरकते छपाई यंत्र (१४३५)
  • तारतंत्र (टेलिग्राफी) (१८६५)
  • अलेक्झांडर ग्रॅहमबेल याचा टेलिफोन (१८७६)
  • इटालीतील गुग्ली येल्मो मार्कोनी यांचे बिनतारी संदेशवहन अथवा रेडिओ (१८९५)
  • लुमिये ब्रदर्सचा सिनेमा (१८९५)
  • फिलो फ्रान्झवर्थचा पहिला चित्रवाणी संच (१९२७)
  • ॅलन टुरिंगची संगणकाची संकल्पना (१९३६)
  • सर्व प्रकारच्या माहितीचे द्विध्रुवीय भाषेत ()रुपांतर करण्याची पध्दती (१९३९-१९४९)
  • मायक्रोचिपचा शोध (१९५८)
  • संगणकाच्या परस्परांतील संज्ञापन तंत्रातील विकास (१९६१)पहिला संज्ञापन उपग्रह, टेलस्टार (१९६२)
  • पहिला सेल्यूलर फोन बाजारात (१९७९)
  • कॉपी करणारे मशीन (झेरॉक्स) फॅक्स (१९८४-८५)
  • वैश्र्विक संगणक महाजालाची सुरुवात (१९९०)
  • संगणकीय महाजाल वेब चित्रवाणीवर उपलब्ध (१९९७)
  • मंगळावर उतरलेल्या नासा च्या पाथफाईडरची दृष्यचित्रे थेट इंटरनेटवर उपलब्ध (१९९०)

संज्ञापन व जन संज्ञापन क्रांतीत ज्यांचे उघड व भरघोस योगदान आहे त्या टप्प्यांना स्पर्श करीत नंतर या क्रांतीचे स्वरुप व परिणाम आपण तपासून पाहणार आहोत. गटेनबर्गनंतरचा पहिला टप्पा म्हणजे आधुनिक काळातील आद्य प्रसारमाध्यम असे वृत्तपत्र.

वृत्तपत्रे :
गटेनबर्गच्या आधी माहितीचा प्रसार करण्याची साधने फारच मर्यादित होती. राजे महाराजांच्या आज्ञम्प्;म्प्;ाा, कायदे, नियम, सूचना, शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे, कापडावर लिहून पाठविल्या जात. भारतात तोंडी दवंडी पिटण्याची व्यवस्था अनेक खेडयांत व मोठया गावांमध्येही अगदी ५० वर्षापूर्वीपर्यत चालत आली होती.

चीनमध्ये छापील पत्रकांद्वारे माहिती सूचना प्रसाराची व्यवस्था ख्रिस्तपूर्व सातव्या शतकापासून अस्तित्वात होती. रोमन साम्राज्यातही राजधानीतल वार्ता दूरवर पोहचविण्यासाठी हस्तलिखित पत्रके पाठविली जात. युरोपात व्यापारविषक घटना संकलित करुन बातमीपत्रे तयार करायची व ती वाटायची ही प्रथा जर्मनीतील फगर या धनाढय व्यापारी घराण्याने पंधराव्या शतकात सुरु केली होती. पण चीन, रोम, वा जर्मनीतील ही वार्तापत्रे सरकारी अधिकारी आणि मूठभर धनाढयांच्या हातीच जात असणार यात शंका नाही. साक्षरतेचे प्रमाणच नगण्य होते. आधुनिक वृत्तपत्राची सुरुवात गटेनबर्गनंतर अशीच वार्तापत्रे अधिक प्रमाणात छापून वाटण्याने झाली.

लंडनमध्ये १६२१ मध्ये छापले गेलेले कोरान्ते हे अशा प्रकारचे पहिले वार्तापत्र. त्याचसुमाराच युरोपातही हीच टुम निघाली. अर्थातच या पत्रातील वार्ता व्यापार्‍यंाच्या, धर्मगुरुंच्या आधिशासक वर्गाच्या उपयोगाच्या होत्या हे उघडच आहे. माहिती म्हणजे सज्ञ्ल्त्;ाा (इन्फोरमेशन इज पॉवर) ही उक्ती शास्त्या वर्गाला फार पुरातन काळापासून माहित आहे.

सतरा अठराव्या शतकापासून व्यापाराला वेग आला, व्यापारी व दर्यावर्दी दूरदूर प्रवास करू लागले. साम्राज्ये उभी राहू लागली. युरोपातील प्रबोधन संस्कृती विस्तारू लागली, औद्योगिक क्रांतीची पताका वाफेच्या इंजिनाने वेगाने पसरविण्यास सुरुवात केली. त्या दणक्यात अनियमित वार्तापत्राचे नियमित वार्तापत्रात व कालांतराने दैनिक वृत्तपत्रात रुपांतर झाले. फ्रेंच राज्यक्रांती व अमेरिकन स्वांतत्र्य चळवळीला वृत्तपांनीच ऊर्जा दिली. धनाढय व्यापार्‍यांच्या व शास्त्यांच्या सोयीसाठी अवतरलेले हे मुदि्रत माध्यम मानवी स्वातंत्र्यांचे, समतेचे व आधूनिक मानवी मूल्यांचे प्रभावी वाहक ठरले. या शतकापासून तर वृत्तपत्रांना सैध्दन्तिक पातळीवर नैतिक मूल्य प्राप्त झाले. वृतपत्रे ही लोकशाही मूल्यांची रक्षक बनली. तत्वत: वस्तुनिष्ठतेचा अंगीकार करुन मानवी समाजाची घडी मुद्रीत प्रसार माध्यमाने बदलून टाकली. आज रेडिओ, चित्रवाणी, संगणकीय महाजाल यांच्या प्रसाराने वृत्तपत्रंाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यासारखे वाटत असले तरी त्यांचे नैतिक बळ अजूनही कमी झालेले नाही. तत्वचर्चा, संकल्पनाविस्तार, मूल्यविवेचन या गोष्टींसाठी वृतपत्रे हेच एक माध्यम लोकांनी स्वीकारले. आजच्या वृत्तपत्रात छोटया उपयुक्त जाहिराती, करमणुकीची माहिती, दैनंदिन घडामोडींची माहिती येथपासून तो क्रीडा, व्यापार, राजकीय तत्वचर्चा, आध्यत्मिक मीमांसा येथपर्यत सर्व काही मिळते. त्यामुळे सामान्यांसाठी संज्ञापनाचे अत्यंत उपयुक्त साधन म्हणून वृत्तपत्र ही संपत्ती अतिशय महत्वाची झाली. वृत्तपत्रांचा हाच सर्वसमावेशक ढाचा रेडियो व चित्रवाणी वाहिन्यांनी देखील स्वीकारला आहे.

भारतातील वृत्तपत्र खपाचा अभ्यास केल्यास असे आढळून येते की आजच्या तुलनेने पंचवीस पन्नास पंचाहत्तर वर्षापूर्वी वृत्तपत्रांच्या किंमती खुपच कमी असल्या तरी तत्कालीन कामगार, शेतकरी, कारकून, शिक्षक व इतर मध्यमवर्गीयांच्या यशक्तीच्या आवाक्यात बसणार्‍या नव्हत्या, त्यामुळे तत्कालीन साक्षरतेच्या मानाने कमी लोक वृत्तपत्रे विकत घेत. दुसर्‍याकडून मागून आणित, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये जाऊन वाचत किंवा सार्वजनिक वाचन करीत. मुंबईच्या गिरणगावातील कामगार पंचवीस तीसच्या घोळक्याने असे वृत्तपत्र वाचन करीत. आज या वर्गाच्या यशक्तीच्या आवाक्यात वृत्तपत्रे आल्याने किंमती वाढल्या तरी वृत्तपत्रे अधिक विकत घेतली जातात. विकत घेताना दिसतात. वृत्तपत्रांचे सर्वसाधारणीकरण असे सर्वत्र होत गेले आहे. म्हणून वृत्तपत्रांच्या प्रभावाने मुक्तीच्या संकल्पनेला चेतना दिली असे मानले जाते.

याही पुढे मुक्तीची उडी घेतली ती चित्रपट, रेडिओ, व चित्रवाणी या प्रसार माध्यमांनी माहिती, ज्ञान व करमणूक साध्य करण्यासाठी त्यांनी साक्षरतेची अटच बाद करुन टाकली. संगणक क्रांतीच्या बाबतीत मात्र हे म्हणता येणार नाही.

तारतंत्र
अठराव्या शतकापर्यंत जगातील व्यापार मोठया प्रमाणावर वाढला होता. व्यापारानिमिज्ञ्ल्त्;ा अनेक साहसी वीर नवनव्या पध्दतीने अधिकाधिक सक्षम जहाजे बांधून दूरदेशी जात होते. नवनवे शोध लागून नवी तंत्रज्ञाम्प्;ााने निर्माण होत होती. व्यापाराच्या विस्तारासाठी ब्रिटनसारखी साहसी राष्ट्रे अनेकविध भूप्रदेशांवर प्रभुत्व मिळवून साम्राज्ये प्रस्थापित करत होती. व्यापारी समाजच्या तशाच साम्राज्यवादी राज्यकर्त्याच्या गरजा विविध पातळयांवर वाढत होत्या. या गरजांच्या दबावातूनच तार यंत्राचा विकास झाला. इ. स. अठराशेच्या सुमारास ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय उपखंडाच्या मेाठया भूप्रदेशावर प्रभूत्व प्रस्थापित केले होते. भाराताप्रमाणेच ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, वगैरे साहसी व्यापारी सज्ञ्ल्त्;ा मलाया, संपूर्ण आग्नेय, आशिया, चीन, आफि्रका, उत्तर व दक्षिण अमेरिका, येथेही प्रभुत्व प्रथापित करीत होत्या.

अशा परिस्थितीत लंडनहुन निघालेल्या कंपनीच्या किंवा सरकारी आज्ञम्प्;म्प्;ाा, सूचना अधिकार्‍यांची पत्रे खाजगी पत्रे कलकज्ञ्ल्त्;ाा, हाँगकाँग किंवा अमेरिकेत पोहचण्यास माहिनोनमहिने लागत. वाफेवर चालणार्‍या जहाजांचा वेग असेल तेवढीच गती या पत्रांची असायची खुश्कीच्या मार्गाने तर ही गती अधिकच मंद असायची युरोपात विशिष्ट अंतरांचे टप्पे ठरवून प्रत्येक टप्प्यावर घोडागाडी बदलण्याची सोय केल्याने पत्रे किंवा प्रत्यक्ष प्रवास थोडया वेगाने होत असे हे खरे. पण भारतात तीही सोय नव्हती. माउन्ट स्टुर्अट एलफिन्स्टनला डेक्कनचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाल्याचे पत्र मिळल्यावर तो चार्ज घेण्यासाठी कलकत्याहुन निघाला तेव्हा त्याला पुण्यास पोहोचण्यास तीन महिने लागले. ही गोष्ट एकोणिसाव्या शतकात तिसर्‍या दशकाची. व्यापार वाढला. अर्थकारण वाढले. राजकारणची प्रादेशिक व्याप्ती वाढली. राज्यकर्त्याचे व्याप वाढले. गुंतागुंत वाढली. पण संज्ञापन वेग वाढत नव्हता. माणूस अजूनही पृथ्वीला जखडून होता. दूरची अंतरे व्यापाराला व प्रशासनाला गैरसोयाीची ठरत होती. ही गैरसोय दुर करणे ही तातडीची गरज होती.

तार तंत्राचा विकास ही अशी अपरिहार्य घटना झाली. सतराव्या शतकाच्या शेवटी घर्षणविद्युत व रासायनिक द्रव्यांमधून निर्माण होणारा विद्युतभार या गोष्टींची कल्पना शास्त्रज्ञम्प्;ाांना येऊ लागली होती. सुमारे १८२० च्या दरम्यान रासायनिक विद्युत घटांच्या साहाय्याने तारेमधुन विद्युतप्रवाह पाठवून दुसर्‍या टोकाला असलेल्या चुंबकाच्या हालचालीचे ठसे कागदावर उमटविण्याचे प्रयोग होऊ लागले. आणि त्यातूनच तारेने सांकेतिक संदेश पाठविण्याच्या कल्पनेचा उगम झाला. संदेश पाठविणार्‍याने संकेतानुसार विद्युप्रवाहात बदल घडवून आणायचे आणि तारेच्या दुसर्‍या टोकाला बदलत्या प्रवाहानुसार हलणार्‍या चुंबकाच्या मदतीने सांकेतिक खुणा कागदावर रोखून घ्यायच्या हे तंत्र १८३६ मध्ये अमेरिकेतील सॅम्युअल मोर्स याने विकसित केले आणि संज्ञापन तंत्रात नीव क्रांती झाली. आजही कितीतरी ठिकाणी या मोर्स कोडच्या साहाय्याने संदेश पाठविले जातात. अगदी २० ते २५ वर्षापूर्वीपर्यत भारतात आपल्याला तारा मिळायच्या त्या या मोर्सच्या तंत्राने.

तार यंत्राच्या विकासाचे मानवी समाजावर सखोल व दूरवर परिणाम झाले. व्यापार वाढला, उद्योगधंदे, वाढले, साम्राज्यांची सज्ञ्ल्त्;ाा अधिक दृढ झाली. लष्करांना संदेशवहनाचे वेगवान साधन मिळाले. कतुतरे बेकार झाली. व्यापारातील व सत्तेतील मक्तेदारी वाढली व व्यापाराला खरेखुरे आंतरखंडीय असे जागतिक स्वरुप लाभले.

तार यंत्रामुळे संज्ञापन क्षेत्रात आणखी एक महत्वाची घटना घडली. अमेरिकेतील पाच वृत्तपत्र मालकांनी एकत्र येऊन न्यूर्यॉक असोसिएटेड प्रेस नावाची एक संस्था स्थापन केली. तार यंत्राद्वारे दूरदूर ठिकाणच्या बातम्या मिळवून त्या वूज्ञ्ल्त्;ापत्रांना पुरविणे हा या संस्थेचा हेतू होता. हाच आधुनिक वृत्तसंस्थेचा न्यूज एजन्सी जन्म. तार यंत्रामुळे वृत्तपत्रांना नवे परिमाण प्राप्त झाले. वृत्तपत्र या माध्यमाची शक्ती व उपयुक्तता वाढली. भौगोलिक अंतर अप्रिय वाटत असले तरी प्रियंजनांच्या सुख दु:खाच्या बातम्या ताबडतोब मिळणे शक्य झाले.

पंरतु सर्वसामान्य नागरिकांना तार व्यवस्था खुली व्हायला बराच वेळ लागला. ठिकठिकाणच्या सरकारांनी आपआपल्या देशांतील तार व्यवस्थांवर एकाधिकार प्रस्थापित केला. बहुतेक ठिकाणाच्या तारयंत्रणा फक्त सरकारच्या व लष्करांच्या कामासाठीच वापरल्या जाऊ लागल्या. प्रस्थापितांची ही एकाधिकारशाही अनैसर्गिक होती. ईस्ट इंडिया कंपनीसारख्या अवाढव्य साम्राज्य असलेल्या व्यापारी संस्थांच्या दबावाने हळूहळू ही व्यवस्था खुली होऊ लागली व विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यत संज्ञापन क्षेत्रात तार व्यवस्थेने संपूर्ण प्रभुत्व प्रथापित केले. टेलिफोन नावाचे नवे उपकरण बाजारात आले तेव्हा तार साम्राज्याच्या प्रसाराला थोडीशी खीळ बसली.

टेलिफोन
ध्वनीचे विद्युत प्रवाहात रुपांतर करुन तारेच्या दुसर्‍या टोकाला त्याच ध्वनीची पुननिर्मिती करण्याचे तंत्र अ‍ॅलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये विकसित केले. त्याचे महत्व ओळखून टेलिफोन लगेच बाजारात आला व थोडयाच अवधीत त्याने सारे जग पादाक्रांत केले. बेलने स्वत:च एक कंपनी स्थापन करुन टेलिफोनच्या प्रसाराचा प्रयत्न केला पण टेलिफोनचे जाळे हे केबल किंवा तार तंत्राच्या जाळयापेक्षा अधिक गुंतागुंतीचे असणार हे उघड होते. तारेची यंत्रणा एखाद्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी बसविली की काम भागते तेथे आलेले संदेश कागदावर लिहून त्या त्या ठिकाणी पाठविले जातात. टेलिफोनची केबल शहरात मध्यवर्ती ठिकाणी आली तरी तेथून ठिकठिकाणी तारा जोडाव्या लागतात. शिवाय मध्यवर्ती केंद्रात येणार्‍या टेलिफोन रहदारीचे नियंत्रण करण्यासाठी एक्स्चेंज ची व्यवस्था करावी लागते.

त्यामुळे सुरुवातीला बेल कंपनीचा प्रयत्न फसला. अमेरिकेत व युरोपात विविध ठिाकणी खाजगी कंपन्या टेलिफोन जाळयाच्या समस्येवर काम करु लागल्या. एक्स्चेंज ची कल्पना विकसित होऊन १८८० पर्यत स्थिर झाली. बेल साहेबांनी पुन्हा १८८५ मध्ये सुप्रसिध्द ए. टी. अ‍ॅण्ड टी. (अमेरिकन टेलिग्राफ अ‍ॅण्ड टेलिफोन) कंपनी स्थापन केली व पुढे याच कंपनीने टेलिफोननचे उपकरण, केबलच्यचा तर्‍हा, एक्स्चेंजची कार्यदध्दती दूर अंतरावरील फोन (ट्रंक कॉल) या व्यवस्थांचे सुलभीकरण व प्रमाणीकरण केले. पाश्चात्य देशामंध्ये टेलिफोन मध्यमवर्गीयांच्या घरांमध्ये देखील शिरला. तो भारतीय मध्यमवर्गीयांच्या घरांत शिरायला सत्तार ऐंशी वर्षे लागली.

आता आपल्याला तार तंत्राचे महत्व कमी वाटते व टेलिफोन अधिक महत्वाचा व उपयुक्त वाटतो हे खरे. पण संज्ञापन क्षेत्रात संदेशवहन तंत्राचा आलेख काढताना तारयंत्रणेचे महत्वाचे स्थान आहे. टेलिफोन याच तंत्राच्या प्रगतीचा पुढचा टप्पा आहे. टेलिफोनने संज्ञापन व्यवस्थेत जी क्रांती घडवून आली त्या क्रांतीने टेलिफोन जोरदार वेग करुन दिला. व्यापार उद्योगंधदे प्रशासन यांच्या व्यवस्था अधिक कार्यक्षम होऊ लागल्या. लष्करी हालचालींसाठी ताबडतोब टेलिफोनमुळे व्यक्तींच्या परस्पर संपकर्ाला नवे परिमाण प्राप्त झाले. हलो, हलो, ला हलकट उज्ञ्ल्त्;ारसारख्या प्रकाराने खाजगी जीवनात नव्या डोकेदुख्या निर्माण झाल्या तरी टेलिफोनची उपयुक्तता व लोकप्रियता वादातीतपणे वाढतच गेली.

आधुनिक युगात टेलिफोनची उपयुक्तता अधिकच वाढली असून त्याने संज्ञापन क्रांतीला मोठाच हातभार लावला आहे. टेलिफोन केबलद्वारे संगणक एकमेकांना जोडून त्याद्वारे माहितीचे महाजाल निर्माण केले गेले. आता संगणक, चित्रवाणीसंच व टेलिफोन यांना एकत्र करुन संज्ञापन क्षेत्रात अभूतपूर्व अशी क्रांती होऊ घातली आहे.
बिनतारी संदेशवहन व रेडिओ

टेलिफोन स्थिर होत असतानाच विद्युतचुंबकीय लाटांच्या साहाय्याने संदेशवहन शक्य होत असल्याचा शोध ब्रिटनमधील जेम्स मॅक्सवेल व जर्मनीतील हेन्सिच हटेस् या शास्त्रज्ञम्प्;ाांना १८८८ च्या सुमारास लागला.

हे तंत्र विकसित करीत इटलीतील मार्कोनी याने अशा लहरींवर स्वार झालेले संदेश दूरवर पाठवण्यात यश मिळविले आणि जगात एकच खळबळ उडवून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विद्युतचुंबकिय लहरी ढग, धुके, धुळ, असे अडथळे पार करीत विद्युत वेगाने दूर अंतरावर पोहचू शकत. म्हणजे संदेश पाठविण्यासाठी आता तार टाकण्याची गरज उरली नाही. सुरूवातीला तुटक तुटक असे सांकेतिक संदेश पाठविण्यात मार्कोनी यास यश मिळाले. नंतरी शास्त्रज्ञम्प्;ाांच्या लक्षात येऊ लागले की या लहरींना विशिष्ट प्रकारे जोर दिला की त्यामधून न तुटणारा सलग ध्वनी अथवा संगीत ऐकविण्यात कॅनडाच्या रेगिनाल्ड फिसेन्डन या तंत्रज्ञाम्प्;ााने १९०६ मध्ये यश मिळवले व त्यातूनच रेडिओचा जन्म झाला. संज्ञापन तंत्रातील प्रगतीचे हे पुढचे पाऊल होते.

असे बिनतारी यंत्रणेनुसार संदेश पाठविण्याचे व संभाषण करण्याचे तंत्र एवढे सोपे होते की ठिकठिकाणी अनेक लोकांनी आपआपली यंत्रे अमेरिका व युरोपमध्ये तयार केली. बिनतारी संदेशाचा अवकाशात एकच कल्लोळ उडू लागला. त्यालाच हॅम रेडिओ असे म्हणतात. आजही हॅम रेडिओरकांच्या पुष्कळ स्वयंसेवी संस्था जगात कार्यरत आहेत.

परंतु विसाव्या शतकातील पहिल्या दुसर्‍या दशकात जगातील वातावरण अत्यंत तंग होते. युरोपात पहिल्या महायुध्दाचे ढग गोळा होऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर तारांच्या वापराशिवाय कोठेही संदेश पाठविता येणे या गोष्टीला साहजिकच मोठे लष्करी महत्व प्राप्त झाले. भराभर युरोप अमेरिकेतील सरकारांनी हॅम रेडिओच्या वापरावर बंदी घातली सरकारचा व लष्कराचा एकाधिकार बिनतारी तंत्रावर प्रस्थापित केला पहिल्या महायुध्दात दोस्त राष्ट्रांच्या व जर्मन साखळीच्या लष्करांनी बिनतारी तंत्राचा पुरेपूर वापर केला.

तोपर्यत बिनतारी संदेशवहन तंत्रांची सक्षमता व प्रभावीपणा सिध्द झाला होता. त्याचबरोबरच रेडिओ तंत्राची व्यापारी उपयूक्तताही चाणाक्ष उद्योजकांच्या लक्षात आली होती. घरोघरी संदेश स्वीकारणारी यंत्रे बसविली आणि मध्यवर्ती केंद्रातून लोकप्रिय संगीत विद्युतचुंबकिय लहरींवर पाठवले तर ते लोकांना निश्चितच आवडेल व आपल्यालाही फायदा मिळेल हे त्यांनी हेरले या व्यापारी दबावानेच सरकारी बंदी उठली आणि ठिकठिकाणी व्यापारी तत्वावर चालणारी रेडिओं केंद्रे फायद्याचे गणित पुढे रेटणार्‍या व्यापार्‍यांचे आभार मानायला हवेत.

रेडिओ प्रचंड जनसमूहापर्यत पोहचू शकत असल्याने प्रक्षेपण म्हणजेच ब्रॉडकास्टिंग ही नवी संज्ञम्प्;म्प्;ाा वापरली जाऊ लागली. सुरुवातीला ठरावीक अंतरापर्यत पोहचू शकणार्‍या विद्युतचुंबकीय लहरी वापरल्या जात. लवकरच लांब पल्ल्याच्या लघुलहरींचा (र्शॉटवेव्ह) शोध लागला आणि रेडिओचे प्रक्षेपणे देशोदेशी पोहचू लागले. एकाच व्यक्तीचा आवाज जगभर विद्युतवेगाने पोहचू लागला. भौगोलिक अंतर जणू नाहीसे झाले.

राजकीय पुढार्‍यांनी ही क्षमता लगेचच हेरुन तिचा आपल्या विचारांच्या प्रसारासाठी किंवा सज्ञ्ल्त्;ाा संपादनासाछी पुरेपुर उपयोग करुन घेतला. हिटलर, मुसोलिनी, हे नाझी हुकूमशाहा रेडिओ लहरींवर स्वार होऊन सत्ताधिष्ठित झाले असे मानले जाते. संज्ञापनाची विशेषत जनसंज्ञम्प्;म्प्;ाापनाची नवी तंत्रे निर्माण झाली की प्रथापित व्यवस्था त्यावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतात हे आपण मागे पाहिलेच आहे.

रेडिओच्या या राजकीय महत्वामुळे लष्करी उठाव युध्द वा तत्सम प्रसंगी रेडिओ केंद्रे ताब्यात घेण्याकडे हल्लेखोरांचा कल असतो. दहशतवादी संघटना रेडिओ केंद्रांना लक्ष्य करत असतात. आता चित्रवाणी केंद्रांना लक्ष्य करतात.

चित्रवाणीच्या प्रसारामुळे रेडिओचे महत्व कमी झाले. आहे, असे अनेकांना वाटते. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. अजूनही जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचणारे प्रसार माध्यम रेडिओच होय रेडिओची उपयुक्तता आता वेगळया प्रकाराने लोकांच्या ध्यानी येऊ लागली आहे. पण त्या विश्लेषणात जाण्याचे हे स्थान नव्हे.

चलचित्रपट :
संज्ञापन तंत्र व प्रसार माध्यमे यांच्या विकासात चलचित्रपटाच्या तंत्राचा शोध हा महत्वाचा टप्पा आहे. एकोणिसावे शतक नवनव्या वैज्ञानिक व तांत्रिक कल्पनांच्या ऊर्जेने भरुन गेले होते. दृष्य हालचाल चित्राद्वारे टिपण्याची कल्पना नवी नव्हती. एखाद्या मानवी आकृतीच्या एकाच कि्रयेचे तुकडे कल्पून तशी चित्रे पुस्तकात लागोपाठ लावायची व पुस्तकाची पाने र्झरकन फिरवायची की ती मानवी आकृती जणू प्रत्यक्ष हालचाल करताना दिसते अशी खेळण्यातली पुस्तके आजही बाजारात मिळतात. अशाच प्रकारची खेळणी, जादूचा दिवा (मॅजिक लॅन्टर्न) फिरत्या चकत्या १८३० पासून बाजारात होत्या, त्यामागे एकच तत्व होते, स्थिर नजरसमोरच्या चौकटीत हलत्या आकृत्यांची चित्रे एकापाठोपाठ क्रमाने अशी वेगाने दाखवायची म्हणजे चित्रेच जिवंत होऊन हलत असल्याचा भास होतो.

फोटोग्राफीचा शोध लागल्यानंतर प्रत्यक्ष दृष्यांचे फोटो काढून ते दृष्यच प्रेक्षकांना दाखविता आले पाहिजे अशा कल्पनेने भारून अनेक तंत्रज्ञम्प्;ा कामाला लागले. त्यासाठी वेगाने एकापाठोपाठ चित्रे टिपणारा कॅमेरा त्याला सुयोग्य अशी फिल्म काचेची भाषांतरांवरूनंिागे फिल्म विकसित करण्याची व्यवस्था आणि भाषांतरांवरूनंिागे व प्रकाश शलाकांच्या साहाय्याने हलणारी चित्रे पडद्यावर दाखविण्याची व्यवस्था अशी तंत्रे विकसित करायची होती. या स्पर्धेत पहिले यश मिळाले ते पॅरिस येथील लुमिये बंधूना, सहज हलवता येण्यासारखा कॅमेरा, प्रिन्ंिटगची सोय आणि थोडे बदल करुन त्यातच प्रॉजेक्टर अशी एकत्र सोय असलेले सिनोमाटोग्राफ हे सुटसुटीत यंत्र बंधुद्वयाने तयार केले व २८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिसमधील ग्रॅन्ड कॅफेमध्ये जगातील पहिल्या चलचित्रपटांचे जाहीर प्रदर्शन केले व एकच खळबळ उडाली

त्यानंतर लुमिये बंधूनी आपल्या एक दोन मिनिटांच्या चित्रपटांची प्रदर्शने युरोपभर सुरु केली. त्यामध्ये स्टेजवर येणारे आगगाडीचे इंजिन व डबे, भरलेला बाजार, घोडयावरून दौडणारा माणूस अशी रोमांचकारी दृष्ये होती प्रत्यक्ष हलती दृष्ये पडद्यावर पाहून लोक आश्चर्याने आवक होत. काही लोक घाबरुन पळू लागत. चलचित्राने माणसाला जणू अमर केले आहे. अशा तर्‍हेचे भाष्ये तत्कालीन वृत्तपत्रांनी केली.

थोडयाच अवधीत अधिक लांबीचे वृत्तपट व कथा सांगणारे चित्रपट निर्माण होऊ लागल्े. जगभर ठिकठिकाणी सिनेमा थिअटरे उभारली जाऊ लागली. चित्रपटांनी जार्‍या जगाला भारुन टाकले. करमणुक, संज्ञापन व कला या क्षेत्रांचा चेहारामोहरा बदलून टाकला. नाटके व ऑपेरा हे प्रकार फक्त सधन उच्चभ्रूना परवडणारे होते. सिनेमाने अत्यंत स्वस्तात सामान्य जनांना उच्च दर्जाची करमणूक मिळविण्याचे दालन उघडुन दिले.

संज्ञापन शास्त्रात चित्रपटांच्या अभ्यासाला महत्व आहे. कारण चित्रपटाने संज्ञापनाची नवी भाषा निर्माण केली, वेगळा आकृतिबंध वापरात आणला. विशेषत सुरुवातीच्या नि:शब्द चित्रपटांच्या बाबातीत तर हे विशेष महत्वाचे हलत्या. चित्रांच्या चौकटीतून प्रगल्भ संदेश व कलात्मक आनंद देणे हे संज्ञापन तंत्रातील उच्च दर्जाचे कौशल्य कलावंताच्या सर्जनशीलतेला नवे वळण मिळाले व नव्या दिशा लाभल्यावर नव्या प्रकारचे सिनेसंगीत अवतरले. सिनेमाची व सिनेसंगीताची नवी संस्कृती निर्माण झाली. ज्या गोष्टी व जी दृष्ये कधी पाहिली नाहित व सामान्य सामसाला पाहणे शक्य नाही ती पाहण्याची संधी सिनेमाने दिली. राजकीय व सामाजिक विचारांच्या प्रसाराचे प्रभावी साधन म्हणूनही चित्रपटांचा उपयोग केला गेला.

चित्रवाणी :
ग्रॅहम बेलने टेलिफोन विकसित करण्यासाठी कानाच्या रचनेचा अभ्यास केला होता. टेलिफोन हा टेलिग्राफीचा विस्तार आहे. असे तो म्हणे तारने ऐकणे (हिअरिंग टेलिग्राफिकली) असे तो वर्णन करीत असे. जर तारेने ऐकता येत असेल तर डोळयाच्या रचनेचा अभ्यास करुन तारेने पाहता देखील आले पाहिजे असा विचार लगेच पुढे आणि त्यादृष्टिने प्रयत्न सुरु केले. टेलिग्राफ व टेलिफोन यांचे यश पाहून तारेने प्रत्यक्ष पाहण्याचे यंत्र फार दूर नाही असे लोक सहज समजू लागले होते. अनेकांनी भविष्यलक्ष्मी वाटतील अशी या काल्पनिक यंत्राची चित्रेही रंगविली. अगदी एकोणिसाव्या शतकातच या भावी यंत्राचे नाव काय असावे याचीही चर्चा सूरू झाली होती. अनेकांनी विविध नावे सूचविली त्यात १९०७ साली सायंटिफिक अमेरिकन या मासिकाने या यंत्राला टेलिव्हिजन असे नाव सुचविले. हे यंत्र येणारच असा आत्मविश्र्वास शास्त्रज्ञम्प्;ाांना आणि सर्वसामान्यांनाही होता. पंरतु नाव सूचविल्यानंतर तब्बल ३२ वर्षानी टेलिव्हिजन प्रत्यक्षात आला. त्याला ग्राहकयोग्य असे बाजारी रुप यायला आणखी दहा वर्षे जावी लागली एवढा वेळ लागण्याचे मुख्य कारण म्हणजे बहूतेक तंत्रज्ञम्प्;ा हे यंत्र विकसित करण्यासाठी यांत्रिक पध्दतीचा (मॅकनिकल इंजिनीअंरिंग) वापर करीत होते. पॉलन निपको नावाच्या जर्मन तंत्रज्ञाम्प्;ााने १८८४ साली एका गोलाकार चकतीमध्ये छिद्र पाडून त्यातून प्रकाशकिरणांच्या साहाय्याने दृष्य खेचून घेण्याचा प्रयत्न केला. तशाच तर्‍हेचे प्रयोग युरोपात इतरत्र आणि अमेरिकेतही सूरू होते. पण त्यातून समाधानकारक चित्रे दिसणे कठीण होते. ब्रिटनमध्ये पुढे म्हणजे १९२० साली फिरत्या चकतीच्या तंत्रात सुधारणा करुन दुष्ये पडद्यावर खेचण्याचा जॉन प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न त्यावेळी बीबीसीने केला. अशा तर्‍हेने जिवंत दृष्ये प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न त्यावेळी बीबीसीने केला. पण तोही अर्धवटच प्रयोग सुरु केले. परंतु त्यातूनही समाधानकारक असे काही निष्पन्न होईना. हे सर्व प्रयोग यांत्रिक तंत्रज्ञाम्प्;ाानावर आधारित होते. निपकोच्या फिरत्या चकतीच्या प्रयोगांची माहिती जर्मनीचा सर्वेसर्वा हिटलर यास कळली तेव्हा त्याला ताबडतोब या यंत्राचे राजकीय महत्व ध्यानी आले. त्यामुळे १९३५ साली जर्मनीतही अशा प्रकारची प्रक्षेपणे करण्याचे अयशस्वी प्रयत्न सुरु झाले येणार आणि येणारच असा गाजलेला टेलिव्हिजन तंत्रज्ञाम्प्;ाांच्या आणि प्रक्षेकांच्या हाती मात्र लागत नव्हता अखेर ही कोंडी फुटली ती तंत्रज्ञम्प्;ा मॅकॅनिकल शक्तीऐवजी काचेच्या नलिकेतून विद्युतचुंबकीय साहाय्याने प्रयोग अखेर यशस्वी झाले. आणि १९३९ मध्ये आर. सी. ए. ने प्रक्षेपणही सुरु केले. मात्र दुसर्‍या महायुध्दाच्या धुमशक्रीत हे प्रक्षेपण बंद पडले ते पुन्हा व्यवस्थित रितीने सुरु होण्यासाठी १९४६ साल उजाडले.

पण जगातील अब्जावधी लोकांना खिळवून ठेवणार्‍या या जादूच्या पेटीचा खरा जन्मदाता कोण होता. ही सुध्दा एक कहाणीच आहे व या वादाने चित्रवाणीचे प्रक्षेपण लांबविण्यास हातभार लावला होता.

त्याचे नावे होते फिलोफ्रान्झवर्थ. अमेरिकेतील इदाहो प्रांतातील सामान्य शेतकर्‍याचा मुलगा. विद्यापिठाची पदवी मिळेपर्यत सुध्दा शिक्षण झाले नाही. पण डोक्याने तेज. शतकातील अत्यंत महत्वाच्या यंत्राची त्याला कल्पना सुचली ती घोडयांच्या नांगराने बटाटयाचे शेत साफ करताना. शेताच्या ढेकळांच्या फार्‍यांमधून नांगरताना प्रत्येक रांगेतून पूढेमागे असे फिरत त्याच्या लक्षात आले की या प्रकि्रयेमध्ये आपण शेताचा बिंदूनब्ंिादू शोधून काढतो आहोतम्हणजे स्कॅन करतो आहोत. याच पध्दतीने इलेक्ट्रॉनिक किरणशलाका एखाद्या पुस्तकाच्या ओळी एकापाठोपाठ वाचाव्या तशी दृष्य प्रतिमा स्कॅन करू शकेल.

ही ठिणगी त्याच्या डोक्यात उडाली तेव्हा फिलोचे वय अवघे चौदा वर्षाचे होते. आपली कल्पना त्याने शाळेतील शिक्षक जस्टीन टोलमन यांना सांगितली. टोलमनला आपल्या या प्रज्ञावान शिष्याची कल्पना लगेच पटली आणि त्याने फिलोला उत्तेजन दिले. पुढे फिलोच्या पेटन्ट केसमध्ये त्याच्या बाजूने साक्ष देताना टोलमनने कोर्टात सांगितले की फिलोची आकलनशक्ती व प्रज्ञम्प्;म्प्;ाा एवढी प्रखर होती की १९२१ च्या सुमारास म्हणजे त्याच्या वयाच्या १५ व्या वर्षी फिलो फ्रान्झवर्थने आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचे जेवढे स्पष्ट आणि नेमके विवेचन केले तेवढे त्या काळात दुसर्‍या कोणी केले नव्हते.

काचेच्या नळीतून इलेक्ट्रॉनिक किरणांच्या साहाय्याने प्रक्षेपण करण्याचे उपकरण तयार करायला फिलोला पाच वर्षे लागली सप्टेंबर १९२७ मध्ये त्याचा प्रयोग यशस्वी झाला व त्याने त्याचे पेटन्टही घेतले पुढे १९३३ मध्ये रेडिओ कॉर्पेरेशन ऑफ अमेरिकेने तशाच उपकरणातून प्रक्षपेणास सुरवात केली. फिलोला पेटन्टचे मानधन देण्याचे नाकारले. प्रकरण कोर्टात गेले. फिलो जिंकलीा पण तेवढयात दुसरे महायुध्द सुरु झाले. युध्द संपले तोवर पेटन्टची कालमर्यादा संपत आली होती. फिलोला मानधन मिळाले नाही ते नाहीच आणि अब्जावधी प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्‍या व हजारोंना कोटयाधीश बनविणार्‍या चित्रवाणीच्या या जनकाला अखेरचे दिवस वैफल्यग्रस्त अवस्थेत व जवळजवळ विजनवासात कंठावे लागले. पण विजनवासातही त्याने टी. व्ही. विषयी दूरदर्शी भाकित केले होते. तो आपल्या मुलाला सांगायचा, टी. व्ही. म्हणजे महाश्र्वापद आहे आणि ते खूप लोकांना आपला जास्तीत जास्त वेळ केवळ वाया घालवायला भाग पाडणार आहे.

चित्रवाणीच्या जन्मदात्याची ही भविष्यवाणी खूप मोठया प्रकारे खरी ठरली असली तरी त्याने टी. व्ही. मुळे आधुनिक माहिती संस्कृतीत, राजकारणात व करमणुकीच्या संस्कृतीत घडवून आणलेल्या बहूआयामी क्रांतीचे महत्व कमी होत नाही. रेडिओचा प्रभाव ओळखून मार्शल मॅकलुहानने जग छोटे होत चालले आहे. एखाद्या खेडयाप्रमाणे, अशी मांडणी केली होती. ती टी. व्ही. ने जवळजवळ खरी ठरविली खेडयाती प्रत्येक माणूस इतरांना ओळखतो व केव्हाही कोणाशीही संर्पकसाधू शकतो किंबहूना कायम संपर्कातच असतो

No comments:

Post a Comment