Monday, January 16, 2012

सुभाषचंद्र बोस


***कटक येथील नामवंत वकील जानकीनाथ बोस व प्रभावतीदेवी या सुशिक्षित, सुसंस्कृत दांपत्याच्या पोटी २३ जानेवारी, १८९७ रोजी कटक येथे सुभाषबाबूंचा जन्म झाला. वयाच्या पंधराव्या वर्शी रामकृष्ण परमहंस-विवेकानंद त्यांच्या जीवनात आले. व ते सतराव्या वर्षी सद्गुरूंच्या शोधासाठी गिरीकंदरात-हिमालयात वणवण भटकत राहिले. त्यांचे वडील प्रज्ञावान, स्वतंत्र विचाराचे व परखड वृत्तीवरचे होते. तर आई 'श्यामची आई' होती. वडील 'तायबहादूर' होते. पण इंग्रजाचे उर्मट वर्तन पाहून त्यांनी नोकरी व पदवी दोन्ही सोडून दिल्या. सुभाष वडिलांच्या समाधानासाठी आय. सी. एस. होण्यासाठी इंग्लंडला गेले व केंब्रिज विद्यापीठाचे पदवीधर होऊन परत आले.

***१९२१ सालच्या जालियनवाला हत्याकांडाने संतप्त होऊन त्यांनी आय. सी. एस होऊनही इंग्रजांची नोकरी स्वीकारली नाही. मातृभूमी स्वतंत्र करण्याचा विडा उचलला. गांधीजींना भेटले. गांधीजींनी असहकाराचे आंदोलन सुरू केले होते. त्यांनी सुभाषाना डॉ. चित्ता रंजन दास यांच्याकडे पाठविले. बंगाली युवकांचा कंठमणी, बॅरिस्टर, फर्डा वक्ता, देशभक्त, विव्दान गुरू हिमालयात मिळाला नव्हता. गांधीजींनी दिला. दोघांचीही कारागृहातच मैत्री जमली. गुरू-शिष्याचे नाते तयार झाले. बंगाली क्रांतिकारकांना व युवकांना दोघांचे जबरदस्त आकष्र्ण, सुभाष बंगाल प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष झाले. एका दहशतवाद्याचा सत्कार केल्याच्या आरोपावरून इंग्रजांनी सुभाषना मंडालेच्या तुरूंगात पाठविले. त्यांची प्रकृती बिघडल्यावरून १९२७ साली त्यांना मुक्त केले.

***भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक नेते व आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्र बोस ओळखले जातात. 'नेताजी' ही त्यांना लोकांनी दिलेली पदवी. सुभाषबाबूंचे घराणे मुळचे बंगालमधील माहिनगटचे. त्यांचे वडील वकिलीच्या व्यवसायानिमिज्ञ्ल्त्;कटकला (ओरिसा) आले होते. त्या वेळी सुभाषबाबूंचा जन्म झाला.

***शालेय जीवनातच सुभाषबाबूंवर स्वांमी रामकृष्ण आणि विवेकानंद या दोन महापुरूषांचा मोठा प्रभाव पडला. कॉलेजमध्ये गोर्‍या प्राध्यापकांच्या उर्मट वर्तणुकीने अपमानित विद्याथ्र्यांनी नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपविले. परंतु कॉलेजमधून त्यांना काढून टाकण्यात आले. आशुतोष मुखर्जीच्या मदतीने ते बी.ए. झाले व पुढे आय. सी. एस. साठी इंग्लडंला गेले.

***महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्याकरिता ते गांधीजींना भेटले असता गांधीनी त्यांना कलकत्याला चित्ता रंजन दासांकडे पाठविेले. गुरुच्या शोधात असणार्‍या सुभाषबाबूंना त्यांचा गुरू मिळाला. इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या कलकज्ञ्ल्त्;ाा आगमनावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यातही सुभाषबाबंूनी पुढाकार घेतला. आणि चित्ता रंजन दासांबरेाबर सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. नंतर काही दिवस त्यांनी बंगाल नॅशनल विद्यालयाचे प्राचार्य आणि 'स्वराज्य' या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून जबाबदारी पदाची जबाबदारी सुभाषबाबूकडे आली. पुढे ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. जवाहरलाल नेहरुंबरोबर त्यांनी 'इंडिया इंडिपेंडन्स यूथ लीगची ' स्थापना केली. १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली. कारावास संपल्यानंतर ते कलकज्ञ्ल्त्;ाा महानगरपालिकेचे महापौर झाले. भगतसिंग यांची फाशीची शिक्षा गांधी आयर्विन कराराचा जाहिर विरोध केला आणि गांधीजींचा व त्यांच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचे मार्ग भिन्न झाले. १९३२ मध्ये सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळींशी संबंध असल्याचे सांगून ब्रिटिश सरकारने सुभाषबाबूंना पुन्हा तुरुंगात पाठविले . प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सोडण्यात आले. व देशातून हद्दपार करण्यात आले. ते पुन्हा भारतामध्ये दाखल झाले व त्यांना अटक झाली. महात्मा गांधीचा विरोध न जुमानता त्रिपुरा कॉग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली व ते निवडून आले. परंतु बहुसंख्य कॉंग्रेसच्या सभासदांनी गांधीजींचे नेतृत्व स्वीकारल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी फॉरर्वड ब्लॉकची स्थापना केली. इंग्रजांना युध्द करुन भारताबाहेर हाकलण्याच्या त्यांच्या मताचा प्रचार त्यांनी चालू ठेवला. कॉग्रेसमधून त्यांची हकालट्टी झाली.

***फॉरर्वड ब्लॉंक व किसान सभा यांचे संयुक्त अधिवेशन भरविण्यात आले व राष्ट्रीय आंदोलनाचे आवाहन करण्यात आले. परंतू कोणताही सत्याग्रह सुरू करण्यापूर्वीच त्यांना स्थानबध्द करण्यात आले. आणि एक दिवस वेषांतर करुन त काबूलला गेले व तेथून जर्मनीस रवाना झाले. जर्मनी-इटलीच्या लष्करप्रमुखांना भेटून त्यांनी ब्रिटिशांविरुध्द लढण्याचा मानस व्यक्तकेले. त्यासाठी जर्मनीतून जपानला पाणबुडीने गेले. २१ ऑक्टोंबर १९४३ रोजी सिंगापुर येथे त्यांनी आझाद्र हिंद्र सरकारची स्थापना केली. सुभाषबाबू त्या सेनेचे सर्वेसवी झाले. त्याला जर्मनी, जपान , इटली, ब्रह्यदेश आदी अकरा राूष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने इंग्लंड ,अमेरिकेविरुध्द युध्द पुकारले. ब्रह्यदेशामधून आझाद्र हिंद्र सेनेला नैसर्गिक आपत्तीमुळे माघार घ्यावी लागली. परंतु सुभाषबाबूंनी नभोवाणीवरुन देशबांधवांचे मनोधैर्य कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला व मांचुरियाहून फिल्डमार्शल ताराऊ याने त्यांना पाठविण्याचे ठरविले. परंतु १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या विमानाचा अपघात झाला व त्यांचे निधन झाले.

****त्यांच्या महान कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने १९९२ मध्ये मरणोत्तर 'भारतरत्न ' पुरस्कार प्रदान केला.

***भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

***आझाद हिंद सेना
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.

No comments:

Post a Comment